Posts

'पुन्हा शिवाजीराजे भोसले’ मधील सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक !

Image
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरनं ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे, जो त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा एकदम वेगळा आहे. चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असं आक्राळ विक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. त्याच्या या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची आणि सोबतीला चित्रपटाबद्दलचीही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.   आपल्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणतो, ''या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रुरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर का...

सतीश शहा काळाच्या पडद्याआड !

Image
ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा (वय ७४) यांचे आज मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. 'जाने भी दो यारो', 'हम आप के है कौन', 'कभी हा कभी ना', 'दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे..... हे त्यांचे गाजलेले चित्रपट. 'ये जो है जिंदगी' या मालिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ही त्यांची गाजलेली मालिका. भारतात दूरदर्शन मालिकांची पायाभरणी ज्यांनी केली त्यात सतिश शाह हे नाव पण अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जसपाल भट्टी, जावेद जाफरी, सतीश शाह ही मंडळी तेव्हा त्यांच्या हलक्या फुलक्या विनोदातून आपल्याला हसवत असायची.  "यह जो है जिंदगी, फिल्मी चक्कर, घरजमाई, ऑल द बेस्ट" ह्या त्याच्या मालिकांनी एक काळ अक्षरशः गाजवला होता. 'हमारे पीए साहब' म्हणून एक मालिकापण लागायची, ती किती जणांना आठवते कल्पना नाही.  त्या काळात मराठी/गुजराती रंगभूमीवरचे अनेक कलावंत DD1,DD मेट्रो,नव्यानेच सुरू झालेले झी टीव्ही,सोनी टीव्ही गाजवत असत. चित्रपटाच्या बाबतीत पण सतीश शाहची कारकिर्द समृद्ध आहे.  'अरविंद देसा...

प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाची ओढ — ‘तू माझा किनारा’चा भावनिक प्रवास सुरू ३१ ऑक्टोबरपासून!

Image
गेल्या महिनाभरापासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेच्या केंद्रस्थानी असलेला ‘तू माझा किनारा’ हा मराठी चित्रपट आता अखेर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची प्रदर्शन तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे. वडील आणि मुलीच्या नात्याचा भावस्पर्शी प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी सोशल मीडियावर या ट्रेलरचे कौतुक करत, कथेत दडलेले भावविश्व आणि अभिनयाची ताकद अधोरेखित केली आहे. आता सर्वांनाच या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहायची कारणं मिळाली आहेत. ‘तू माझा किनारा’ ही कथा आहे प्रत्येक वडिलांची, ज्यांना आपल्या मुलीबद्दल खूप सांगायचं असतं पण शब्द सापडत नाहीत आणि प्रत्येक मुलीची, जी आपल्या बाबांना समजून घ्यायचा प्रयत्न करत राहते. ही कथा आहे एका अशा कुटुंबाची, जे प्रेम, संघर्ष आणि समजुतीच्या दरम्यान स्वतःचा “किनारा” शोधतं. हा सिनेमा केवळ बाप लेकिच्या नात्याची कथा नाही, तर प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे. आई वडील, मुलं, त्यांच्या भावना, छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद...

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

Image
मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२५ रोजी लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे येथे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचा उद्देश मराठी संगीताला एक नवा, आधुनिक चेहरा देत जागतिक मंचावर नेण्याचा आहे. पारंपरिक मराठी संगीत आणि आधुनिक संगीतशैलींचा संगम घडवून आणणारा हा फेस्टिव्हल महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. या महोत्सवात ४० हून अधिक कलाकार सहभागी होणार असून, फ्युजन, हिप-हॉप, हाऊस, रॅप, इलेक्ट्रॉनिक अशा विविध संगीतशैलींमधून मराठी बीट्सवर प्रेक्षक थिरकणार आहेत. प्रमुख कलाकारांमध्ये क्रेटेक्स, रॉक कच्छी, संजू राठोड, श्रेया-वेदान्ग, पाट्या द डॉक, इयर डाउन, आणि एमसी गावठी यांचा समावेश आहे. फेस्टिव्हलची ठळक वैशिष्ट्ये: आंतरराष्ट्रीय दर्जाची साउंड व लाईटिंग व्यवस्था आधुनिक म्युझिक प्रॉडक्शनसह मराठी गीतांचा संगम तरुणाईसाठी खास डिझाइन केलेला स्टेज अनुभव बुकमायशोवर ऑनलाईन तिकीट बु...

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

Image
अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवा निमित्त जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे. विकी वाघ याने हे गाण लिहीलं असून या गाण्याची गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शन ही केले आहे. या गाण्याची निर्मिती जेएसबी प्रोडक्शन यांनी केली आहे. हे गाणं कोल्हापूर येथे चित्रीत करण्यात आले आहे.  दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो, “मला खूप दिवसांपासून एखाद एनर्जेटिक गाणं करायचं होत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी “अंबाबाई” गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोझिशनही मला सुचलं. मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाण रेकॉर्ड करायचं ठरवलं. मला अंबाबाईच्या त्या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्...

शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

Image
छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'श्री शिवराज अष्टक' ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, 'फत्तेशिकस्त', ‘पावनखिंड’, ‘ शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आणि आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प नवीन वर्षात १९ फेब्रुवारी २०२६ ला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे नाव आहे..‘रणपति शिवराय’ - स्वारी आग्रा. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल माध्यमातून या भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे.    छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना आपल्या गनिमीकाव्याच्या जोरावर धूळ चारली. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराज...

“संगीत जिवंत असेपर्यंत दीदी जिवंत राहतील.” — पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त दिदी पुरस्कार प्रदान सोहळ्यास नेतृत्व केले

Image
भारत रत्न लता मंगेशकर, ज्यांना प्रेमाने दीदी म्हणून ओळखले जाते, यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे भव्य दिदी पुरस्कार प्रदान सोहळा झाला. शिरीष थिएटर आयोजित या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वे एकत्र आली होती. प्रसिद्ध गायिका माधुरा दातार यांना दिदी पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हा पुरस्कार आशिष शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी दीदींच्या आयुष्यातील काही खास आणि न सांगितलेल्या आठवणी रसिकांसमोर मांडल्या आणि म्हणाले, “ज्या पर्यंत आवाज आहे, स्वर आहे, संगीत आहे, करुणा आहे, त्या पर्यंत त्या राहतील — आणि म्हणूनच त्या माझ्या मोठ्या बहिण आहेत.” आशिष शेलार म्हणाले, “लता दीदींचं संगीत अमर आहे. त्या भारताच्या आत्म्याचा आवाज होत्या. दिदी पुरस्कारासारख्या उपक्रमांमुळे पुढील पिढ्यांना त्यांच्या स्मृतीतून प्रेरणा मिळत राहील.” पुरस्कार स्वीकारताना माधुरा दातार म्हणाल्या, “दिदी पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. लता दीदींच्या नावाने हा मा...